गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या
मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं
चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड
अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी
मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने
सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे
कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्याच
घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत.
असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 5 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add